नांदेड: मरणयातना कधी संपणार? हनुमंतवाडीत पुल नसल्याने नदीतून प्रवास

हनुमंतवाडी ते कुरुळाला जोडणारा नदीवरील पुल नसल्याने गावकऱ्यांना जिव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो.
नांदेड: मरणयातना कधी संपणार? हनुमंतवाडीत पुल नसल्याने नदीतून प्रवास
नांदेड: मरणयातना कधी संपणार? हनुमंतवाडीत पुल नसल्याने नदीतून प्रवाससंतोष जोशी

संतोष जोशी

नांदेड: स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होऊनही नांदेड जिल्ह्यातील हनुमंत वाडी इथं ल्या मरणयातणा संपल्या नाहीत. हनुमंतवाडी ते कुरुळाला जोडणारा नदीवरील पुल नसल्याने गावकऱ्यांना जिव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो.

हे देखील पहा-

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील हनुमंत वाडी हे साडेपाचशे लोकवस्तीच गाव आहे. या गावाला दैनंदिन व्यवहारासाठी नदीतून ये - जा करावे लागते. नदीवर पुल नसल्याने कुरुळ्याला आणि तालुक्याला जाण्यासाठी जिव धोक्यात टाकून प्रवास केल्या शिवाय पर्याय नाही. काल एक शेतकरी नदीला आलेल्या पुराच्यापाण्यात वाहून गेला. काल मृत शेतकऱ्याला शवविच्छेदनासाठी नदीतून न्यावे लागले. मृत्यू नंतर ही गावकऱ्यांच्या यातना संपलेल्या नाहीत.

कुणी आजारी पडले किंवा प्रसुती साठी महिलांना असंच खाटेवर नेण्याशिवाय पर्याय नाही. हनुमंतवाडीच्या ग्रामस्थांनी आजतागायत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना शेकडो निवेदने देऊन पुल करण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली मात्र कुणीही याकडे लक्ष दिले नाही.

नांदेड: मरणयातना कधी संपणार? हनुमंतवाडीत पुल नसल्याने नदीतून प्रवास
Parbhani: कापसाच पीक समाज कंटकांनी उपटून फेकल; माथेफिरूंला अटकेची मागणी

हनुमंतवाडीच्या समस्ये कडे कुणी लक्ष देईल का गावकऱ्यांचा वनवास कधी संपणार. नदीवरील पुलाची आणखी किती वर्षे प्रतिक्षा करावी लागणार असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. नांदेड चे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या कडे सार्वजनिक बांधकाम मंत्री पद आहे. त्यांनी हनुमंत वाडीच्या ग्रामस्थांची पुलाची मागणी पुर्ण करावी अशी मागणी केलीय.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com