Manoj Jarange towards mumbai :
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या १६ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी आज रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गंभीर आरोप केले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर उपोषण करणार असल्याची घोषणा केली. यावेळी मराठा बांधव आणि महिलांनी मनोज जरांगे यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने जाण्यावर ठाम होते. मनोज जरांगे यांच्या मुंबईकडे दिशेने जाण्याऱ्या मार्गाबाबतही माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभू्मीवर जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांकडून जालना आणि छत्रपती संभाजीनगर सीमा भागात बॅरिकेट लावण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईच्या दिशेने जाण्याच्या निर्णयानंतर पोलीस यंत्रणा सजग झाली आहे. मनोज जरांगे हे पैठण-बीडकिन-गंगापूर-वैजापूर-येवला-नाशिक-ठाणे या मार्गावरून जाणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सह्याद्री अतिथी गृहात दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या महत्वाची चर्चा होत आहे. सह्याद्री अतिथी गृहात राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यावर चर्चा होत आहे. मनोज जरांगे पाटील यांची समजूत कशी काढायची यावर खलबते सुरु आहेत. जरांगे पाटील यांच्या मागे किती मराठा समाज आहे, यावर सरकारची पुढील दिशा ठरणार आहे.
सहकार मनोज आंदोलक योगेश केदार यांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी संयमाने घ्यावे. कुणी आरोप केले म्हणून व्यथित न होता जरांगे पाटील यांनी संयमाने घेणे गरजेचे आहे. त्यांचा जीव अत्यंत महत्वाचा आहे.जवळच्या माणसाने आरोप केले म्हणून व्यथित होऊ नये. सर्व संयमाने घेतले पाहिजे, असा सल्ला योगेश केदार यांनी घेतला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.