हिंगोलीतील दुहेरी हत्याकांडाचा चार वर्षांनी निकाल; 9 जणांना जन्मठेप

दरम्यान हा निकाल समजताच हिंगोलीच्या न्यायालयाबाहेर आरोपींच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.
हिंगोलीतील दुहेरी हत्याकांडाचा चार वर्षांनी निकाल; 9 जणांना जन्मठेप
हिंगोलीतील दुहेरी हत्याकांडाचा चार वर्षांनी निकाल; 9 जणांना जन्मठेपसंदिप नागरे

संदिप नागरे

हिंगोलीत शेतीच्या वादातून चार वर्षा पूर्वी बाप लेकाचा डोक्यात धारधार शस्त्राने वार करून खून करणाऱ्या भावासह नऊ जणांना हिंगोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल चार वर्ष सुरू असलेल्या या खून प्रकरणात आज हिंगोली न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. हा निकाल देताना न्यायालयाने घटनास्थळावरील पुरावे व साक्षीदार बारकाईने तपासले, त्या नंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोन महिलांसह सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या निकालानंतर जन्मठेप सुनावलेल्या आरोपींना न्यायालयात रडू कोसळले. दरम्यान हा निकाल समजताच हिंगोलीच्या न्यायालयाबाहेर आरोपींच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.

हिंगोलीतील दुहेरी हत्याकांडाचा चार वर्षांनी निकाल; 9 जणांना जन्मठेप
नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय ढकलला पुढे

यासंदर्भात सरकारी वकील अॅड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील जामठी खूर्द येथील अंबादास आबाजी भवर व त्यांचा भाऊ रामप्रसाद आबाजी भवर यांच्यामध्ये त्यांच्या आईच्या नावे असलेल्या शेतीचा वाद होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये किरकोळ हाणामारीच्या घटना देखील होत होत्या. दरम्यान 22 जानेवारी 2016 रोजी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास अंबादास भवर, उद्धव भवर, संजय भवर हे शेतात काम करत होते. यावेळी शेतामध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला. यावेळी दहा जणांनी अंबादास भवर, उद्धव भवर व संजय भवर यांना तलवारी, काठीने कुर्‍हाडीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये अंबादास भवर व उद्धव भवर यांचा मृत्यू झाला. तर संजय भवर गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी आयोध्याबाई उद्धव भवर (रा. जामठी खूर्द) यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला होता.

तत्कालीन पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर यांच्या पथकाने अधिक तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणात एकूण सतरा साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दुहेरी खून प्रकरणात प्रल्हाद आबाजी भवर, रामप्रसाद आबाजी भवर, आत्माराम प्रल्हाद भवर, बालाजी रामप्रसाद भवर, माधव प्रल्हाद भवर, नंदाबाई आत्माराम भवर, नामदेव दाजीबा घ्यार, विठ्ठल दाजीबा घ्यार, पार्वतीबाई माधव भवर या नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर सुजानबाई भवर यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. एन.एस. मुटकुळे यांनी काम पाहिले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com