बीड - पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात Kokan झालेल्या पुरस्थितीमुळे, नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. या पुरामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. आज त्यांना अन्ना आणि पाण्याची सोय होत नाही आहे. त्यामुळे आज या पूरग्रस्तांना नेत्यांच्या दौऱ्यापेक्षा मदतीची गरज Helping Hand आहे. त्यामुळे नेत्यांनी दौरा करण्यापेक्षा अगोदर मदत करावी असा सल्ला शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे Vinyak Mete यांनी दिला आहे. ते बीडमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाच्या 119 व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
हे देखील पहा -
पुढे ते म्हणाले की, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक गाव वाहून गेले आहेत. अनेक व्यक्तींसह जनावरांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे तिथे होत्याचे नव्हते झाले आहे. घरामध्ये जे होते ते वाहून गेले आहे. यामुळे तेथील नागरिकांच्या समोर पिण्याच्या पाण्यासह खाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे दौरे आणि भाषण करून त्यांच्या पुढे असणारे आजचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे त्यांना अगोदर मदत करा असा सल्ला आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.