बुलढाणा - जिल्ह्यातून जाणारा नांदेड - बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१-जी वरील शेगाव - जळगाव दरम्यान असलेल्या पूर्णा नदीवरील पुलाच बांधकाम अपूर्ण असल्याने रोज अपघात घडून अनेकांचे प्राण जात आहेत. तर अनेक नागरिक कायमचे अपंग होत आहेत. म्हणून खिरोडा येथील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल अडवून धरल्याने या मार्गावरील वाहतूक वळण रस्त्याने वळविण्यात आली आहे.
हे देखील पहा -
महामार्गावरील या पुलाच काम ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने २०१७ पासून अपूर्ण ठेवल्याने व अपूर्ण पुलावरून वाहतूक सुरू केल्याने रोजच या पुलावर अपघात घडतात या मुळे गावकऱ्यांनी हा मार्गच बंद पडला आहे. यामुळे मात्र वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. संबंधित कंपनीच्या व्यवस्थापक उपाध्याय यांचेशी फोनवरून माहिती घेतली असता या पुलाच काम खिरोडा येथील गावकऱ्यांनी बंद पाडलं असल्याची माहिती दिली तर संबंधित ठेकेदार हा "मी गडकरींचा माणूस असून माझं काही बिघडत नाही" अशी गावकऱ्यांना धमकी देत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.