गोविंद साळुंके
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर-राहाता तालुक्यातील एकरुखे गावात राहणारे दिलीप आभाळे हे काल (दि.१६) त्यांच्या नंदू क्षीरसागर नावाच्या मित्रासोबत गणेशनगर येथे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना गणेशनगर फाट्याजवळ काही तृतीयपंथींनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली.
हे देखील पहा :
त्यावेळी झालेल्या वादात चार तृतीयपंथी आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने दिलीप आभाळे यांना त्यांच्या एकरुखे गावात जाऊन लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली असून पोलिसांनी बारा तासात 8 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पैसे दिले नाही याचा राग मनात धरून तृतीय पंथीयांनी इतर साथीदारांना बोलावून दिलीप आभाळे यांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते.
रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून. पोलिसांनी तात्काळ वेगवेगळी पथके नेमून गुन्ह्यातील आठ आरोपींना बारा तासाच्या आत वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे. या प्रकरणात आणखी किती आरोपी आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.