बीड शहरातील प्रसिद्ध व्यापारी असणाऱ्या टेकवाणी (Tekwani Family) कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. टेकवाणी कुटुंबातील पाच जण बुधवारी सायंकाळच्या सुमारास बीडहून अहमदनगरकडे आपल्या कारमधून जात होते. आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी फाट्यावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने, वेगात असणारी हि कार रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात धडकली.
या अपघातात सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी ,लखन टेकवानी या चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून निरज टेकवाणी हे गंभीर जखमी झाले आहेत. बीड शहरातील टेकवाणी कुटुंब एक प्रतिष्ठित व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.