साहित्य संमेलन अन् राजकीय व्यक्तींची उपस्थीती; पुन्हा जुन्या वादाला फोडणी

त्यात आता भर पडली आहे, ती संमेलनामध्ये राजकीय व्यक्तींचा वावर आणि व्यासपीठावरील उपस्थितीच्या वादाची.
साहित्य संमेलन अन् राजकीय व्यक्तींची उपस्थीती;  पुन्हा जुन्या वादाला फोडणी
साहित्य संमेलन अन् राजकीय व्यक्तींची उपस्थीती; पुन्हा जुन्या वादाला फोडणीSaam Tv

नाशिक : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरील राजकीय व्यक्तींच्या उपस्थिती आणि सहभागाच्या जुन्या वादाला पुन्हा एकदा फोडणी मिळाली आहे. याला निमित्त ठरलंय ते नाशिकचं 94 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. साहित्य संमेलनातील राजकीय व्यक्तींचा वावर आणि उपस्थितीमुळे साहित्य वर्तुळातून पुन्हा एकदा नाराजी व्यक्त होत आहे. साहित्य संमेलन आणि वाद हे आता जणू समिकरणचं बनलं आहे. नाशिकमध्ये होऊ घातलेलं साहित्य संमेलनही त्याला अपवाद राहिलेलं नाही. सुरवातीपासूनचं कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून हे वाद होतांना पाहायला मिळत आहेत. त्यात आता भर पडली आहे, ती संमेलनामध्ये राजकीय व्यक्तींचा वावर आणि व्यासपीठावरील उपस्थितीच्या वादाची.

साहित्य संमेलन अन् राजकीय व्यक्तींची उपस्थीती;  पुन्हा जुन्या वादाला फोडणी
इंधन दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टर प्लॅन तयार!

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि समारोपाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तर साहित्य संमेलनादरम्यान परिसंवादात काही राजकीय नेत्यांचाही सहभाग असणार आहे. राजकीय व्यक्तींच्या सहभागामुळे साहित्य संमेलनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता यावरून साहित्य क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कोण असावं आणि कोण नसावं? याबाबत नेमकी स्पष्टता नसल्यानं साहित्य संमेलनातील राजकीय उपस्थिती काही नवीन नसली, तरी संपूर्ण साहित्य संमेलन राजकारण्यांभोवती फिरू नये, असं साहित्य क्षेत्रातल्या मंडळींना वाटतंय. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी व्यक्तींना प्रवेश असू नये, यावर खरं तर प्रत्येक संमेलनादरम्यान चर्चा झडते. मात्र त्यापलीकडे फारसं काहीही होतांना दिसत नाही.

नाशिकच्या साहित्य संमेलनातही संमेलनाच्या कार्यक्रमात ठोस भूमिका असल्याशिवाय कुणालाही व्यासपीठावर प्रवेश दिला जाणार नाही, अशी ठोस भूमिका साहित्य महामंडळाचे कौतिकराव ठाले पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी मांडली होती. नाशिकच्या आयोजनाबाबत अक्षरयात्रा या अंकात ठाले पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नाराजीही व्यक्त केली होती. मात्र आता संमेलन ऐन काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं याबाबत आयोजक आणि साहित्य महामंडळानं याबाबत मौन राहणं पसंत केलं आहे. त्यामुळे साहित्य संमेलनातील राजकीय उपस्थितीच्या मुद्द्यावरून वादाचा नवा अंक पाहायला मिळत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com