मुंबई : पालिका शाळांत अत्याधुनिक शिक्षण देऊन दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. सरकारदेखील त्यांच्या पाठीशी असून, सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
या शाळांचा परफॉर्मन्स सुधारत असून, पालिका शाळांची अशीच प्रगती सुरू राहिल्यास दोन वर्षांत प्रवेश घेण्यासाठी रांगा लागतील, असा विश्वास राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.
मुंबई : पालिका शाळांत अत्याधुनिक शिक्षण देऊन दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. सरकारदेखील त्यांच्या पाठीशी असून, सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
या शाळांचा परफॉर्मन्स सुधारत असून, पालिका शाळांची अशीच प्रगती सुरू राहिल्यास दोन वर्षांत प्रवेश घेण्यासाठी रांगा लागतील, असा विश्वास राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.
वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच्या एनएससीआय डोम सभागृहात बुधवारी दुपारी पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे रायजिंग स्टार्स २०२० कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. पालिका शाळांतील मुलांची गुणवत्ता वाढत असून, आज त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले, असे ते म्हणाले.
येत्या दोन वर्षांत यामध्ये प्रगती होऊन पालिका शाळेत प्रवेश घेण्यासाठी रांगा लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि शिक्षक, पालकांचे कौतुक केले. मुलांच्या विकास व्हावा, यासाठी सरकारदेखील पालिकांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले.
WebTittle :: Within two years, schools will start queuing for admission to schools: Aditya Thackeray
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.