राज्यात मतदारांची संख्या वाढली

राज्यात मतदारांची संख्या वाढली


मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे दहा लाख मतदारांची वाढ झाली असल्याचे निवडणूक आयोगाची आकडेवारी सांगते. निवडणूक आयोगाने १५ जुलै ते ३१ ऑगस्टदरम्यान मतदार दुरुस्ती याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम राबवला होता. यातून ही माहिती पुढे आली आहे. हा कार्यक्रम येत्या सहा सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

निवडणूक आयोग नियमितपणे मतदार दुरुस्ती याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेत असते. यानुसार राबवलेल्या उपक्रमात ऑगस्टअखेर आठ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ इतके पात्र मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला दहा लाखांपेक्षा जास्त मदारांची संख्या झाली आहे. यात चार कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरुष तर चार कोटी २७ लाख पाच हजार ७७७ लाख महिला मतदार आहेत. २५९३ तृतीय पंथी मतदार आहेत. 

मुंबई उपनगरात राज्यात सर्वांत जास्त म्हणजे ५२७, त्यानंतर ठाणे जिल्ह्यात ४६० तर तिसऱ्या क्रमांवर पुणे जिल्ह्यात २२८ असे तृतीय पंथी मतदार आहेत.

७६,८६,६३६ - पुणे जिल्ह्यातील मतदार
७२,२६,८२६ - मुंबई उपनगरांतील  मतदार
६३,२९,३८५ ठाणे जिल्ह्यातील  मतदार

Web Title: Voters in the state increased by ten lakh

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com