सोलापूर - देशातील सर्वसामान्यांना मोफत रुग्णसेवा देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ सप्टेंबर २०१८ मध्ये ‘आयुष्यमान भारत’ योजना सुरू केली. त्यामध्ये ४९२ रुग्णालयांचा समावेश करण्यात आला. मात्र, योजनेसाठी पात्र असूनही रुग्णांना सेवा देण्यास नकार देणाऱ्या राज्यातील विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, साताऱ्यातील १०३ रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली. त्यांना दंडही ठोठावण्यात आला असून, आणखी ७० रुग्णालयांची चौकशी सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागातील
सूत्रांनी दिली.
‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत महात्मा फुले जनआरोग्य योजनेत राज्यातील सुमारे ८४ लाख कुटुंब पात्र आहेत. ९७१ आजारांवरील उपचारासाठी ४९२ रुग्णालयांची निवड करण्यात आली. मात्र, या योजनेतून लाभ देण्यास रुग्णालयांनी नकार दिल्याने रुग्णांना खासगी दवाखान्याची पायरी चढावी लागली. तर या योजनेसाठी पात्र असूनही काही रुग्णांना लाभ मिळाला नाही. त्याबाबत रुग्णांच्या नातेवाइकांनी थेट केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले. त्यांच्या आदेशानुसार राज्यातील शंभर रुग्णालयांवर कारवाई करण्यात येऊन कोट्यवधींचा दंडही ठोठावला आहे.
Web Title: Aayushyaman Bharat Scheme Hospital Crime
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.