शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण; औरंगाबादेत शेतकऱ्यांचं विश्वासघात आंदोलन

शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण; औरंगाबादेत शेतकऱ्यांचं विश्वासघात आंदोलन

शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं असून या एका वर्षात शेतकऱ्यांना दिलेलं कुठलंही आश्वासन सरकारनं पूर्ण केलं नसल्यानं शेतकरऱ्यांनी औरंगाबादेत विश्वासघात आंदोलन केलं.

क्रांतीचौक भागात अन्नदाता शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत सरकार विरोधी घोषणाबाजी केली. इतकच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला पायदळी तुडवत आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवला.

राज्यात इतरत्रही शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. तसंच भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकलं. शेतकरी संपावर असल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या भागात भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com