श्रीरामपूर येथील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर

श्रीरामपूर येथील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर

राज्यात पाणी प्रश्न तीव्र झाला झालाय. श्रीरामपूर येथील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. इथल्या अशोक नगर फाट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत, ठिय्या दिला आहे. श्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, तसंच जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निषेधार्थ हा रास्ता रोको करण्यात आलाय. काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे, सभापती दिपक पटारे यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको सुरू आहे.

श्रीरामपूर येथील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर

तर नाशिकच्या कळवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केलंय. कळवण तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीचा कळवण-नाशिक रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली.

WebTitle : marathi news water crises maharashtra farmers agitation in shirdi and nashik 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com