राम मंदिर निकालावर शरद पवारांचं 'मोठं' वक्तव्य..

राम मंदिर निकालावर शरद पवारांचं 'मोठं' वक्तव्य..

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात 9 नोव्हेंबरला राम मंदिराचा अंतिम निकाल लागण्याचे संकेत आहेत. या निकालानंतर देशात काहीजण सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रसत्न करतील. अशा वेळी राष्ट्रवादीच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी आपापल्या मतदार संघात शांतता व संयम राहिल यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही असामाजिक तत्वांना या निकालाचा फायदा घेवून समाजात अशांतता निर्माण करता येणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आमदारांच्या बैठकीत केले. 

राष्ट्रवादी भवन मधे आज पवार यांच्या हस्ते विजयी आमदारांचे स्वागत करण्यात आले. व विधीमंडळ पक्षनेते पदाची निवड करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. 

"जो काही निकाल देईल तो सर्वांनी मान्य करायला हवा"
देशात सध्या राम मंदिर निकालाची उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल तो सर्वांनी मान्य करायला हवा. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाचा आदर सर्वणांनीच करायला हवा. असे पवार म्हणाले. 


राज्यातील प्रश्नावर आक्रमक होवून सरकारला जाब विचारा
दरम्यान, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम करताना या राज्यातील जनतेच्या मुळ समस्या व त्यावरील उपाययोजना यावरच भर द्यावा. राज्यातील आर्थिक मंदी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या प्रश्नावर आक्रमक होवून सरकारला जाब विचारावा. अशी सूचना शरद पवार यांनी केली. 

आजच्या या पहिल्याच बैठकीत अजित पवार यांची विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून बिनविरोध व एकमताने निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्याला धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ यांनी अनुमोदन दिले. विधानसभा विरोधी पक्षनेत्याची मात्र आज निवड करण्यात आली नाही. 
 

Webtile : sharad pawars statement on supreme courts verdict on ram mandir and aayodhya

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com