(Video) ... म्हणून या गावात कुणीही गादीवर झोपत नाही

(Video) ... म्हणून या गावात कुणीही गादीवर झोपत नाही

 सांगली जिल्ह्यातील वळसंग गावात तुम्हाला एकही  दुमजली इमारत दिसणार नाही..कारण गावातील मंदिराच्या कळसापैक्षा अधिक उंच घर असू नये अशी इथंली प्रथा आहे.. जर कुणी कळसापेक्षा उंच घर बांधलं तर अनर्थ घडतो अशी आख्यायिका सांगितली जाते.

गावात दोन मंदिरं आहेत. हनुमानाचं आणि ग्रामस्थांच श्रद्धा स्थान असलेल्या केंचरायचं. केंचराया मंदिराचा कळस सर्वात उंच असून या कळसापेक्षा उंच इथं एकही घरं नाही

इतकचं नव्हे तर इथं गावातील मुलीचं दुसऱ्या गावात लग्न झाल्यास. त्या मुलीच्या तीन पिढ्यांचं जावळ हे वळसंगमधील केचरायाच्या मंदिरातच  करावं लागतं.

याशिवाय इथं मंदिरातील गावात फक्त महिलांना प्रवेश आहे.
यातील आणखी एक प्रथा म्हणजे केचराया देव गादीवर विराजमान असल्यानं गावात कुणीही गादी वापरत नाही इतकचं काय लग्नात गादी भेट म्हणून दिली जात नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com