सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येलूर येथे विजेचा शॉक लागून तीन शेतकऱ्यांचा दुर्देवी अंत झाला. शेतामध्ये उसाला पाणी पाजत असताना रात्री ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये आई, मुलगा आणि एका शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. वर्षभरापूर्वी याच येलुर गावात शॉक लागून 5 ते 6 शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. मात्र वीज महावितरण यावर काहीच उपाय योजना करत नसून, त्यांच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.