नाशिक/ इस्लापूर- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. प्रशासनाकडून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू होते.
नितीन श्रीहरी सांगळे (वय ३७, रा. तामसवाडी, ता. निफाड) आणि विलास हिरामण राजनोर (वय ३५, रा. कानडगाव, ता. निफाड) अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यापैकी नितीन यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास विहिरीत उडी मारून, तर विलास यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
किनवट तालुक्यात आत्महत्या
इस्लापूर - कर्जामुळे बियाणे-खतखरेदी कशी करावी, या विवंचनेतून आंदबोरी (ता. किनवट) येथील शेतकरी बाबूराव पोताजी उरे (वय ६०) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
Web Title: Three farmers committed suicide in the state
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.