'विद्यार्थ्याला चांगला माणूस म्हणून घडविणे हा अध्यापनाचा मुख्य उद्देश असावा’

'विद्यार्थ्याला चांगला माणूस म्हणून घडविणे हा अध्यापनाचा मुख्य उद्देश असावा’

नवी दिल्ली -‘आपल्या विद्यार्थ्याला चांगला माणूस म्हणून घडविणे हा अध्यापनाचा मुख्य उद्देश असावा,’ असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले. त्यांच्या हस्ते आज देशभरातील ४६ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. 

या वेळी हडपसर (पुणे) येथील विस्डम वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी, मुंबईच्या अणुऊर्जा केंद्रीय विद्यालयाचे डॉ. ए. जेबीन जोएल आणि नगरच्या श्री समर्थ विद्या मंदिर शाळेचे डॉ. अमोल बागुल या राज्यातील शिक्षकांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. रजतपदक, मानपत्र आणि प्रत्येकी ५० हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवनात कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०१८-१९ देण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक, राज्यमंत्री संजय धोत्रे हजर होते.

नावीन्यपूर्ण उपक्रम  
डॉ. बागुल यांनी ७,५०० विद्यार्थ्यांना बासरीवर राष्ट्रगीत शिकविले. एकाच शैक्षणिक वर्षात २७६ शैक्षणिक उपक्रम राबविण्याची किमया त्यांनी केली आहे.

नवोन्मेषाची भावना रुजवा ः मोदी
सध्या रशियात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने दिलेल्या संदेशात शिक्षकांनी नवाचार व नमोन्वेषाची भावना विद्यार्थ्यांत जागवावी, असे आवाहन केले. 

जोएल यांची शिक्षणपूरक उपकरणे 
मुंबईच्या अणुशक्तिनगर परिसरातील अणुऊर्जा केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक डॉ. ए. जेबीन जोएल यांनी भौतिकशास्त्र सहज व सोप्या पद्धतीने समजावून देण्यासाठी शिक्षणपूरक ८२ नवी उपकरणे तयार केली आहेत.

Web Title: Make a student a good person says Ram Nath Kovind
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com