सरकारी कंपन्यांना तब्बल 25 हजार 640 कोटी रुपयांचा तोटा

सरकारी कंपन्यांना तब्बल 25 हजार 640 कोटी रुपयांचा तोटा

सरकारी कंपन्यांना तब्बल 25 हजार 640 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तोटा झाल्यानं सरकार समोरील अडचणी वाढत असल्याचं वित्त विभागातील सूत्रांनी सांगितलंय. जीएसटीच्या करप्रणालीतून सावरण्याची धडपड करणाऱ्या राज्य सरकारवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतेय.  अशातच कर्जबाजारी राज्यावर तोट्यातील कंपन्यांचा भार पडतोय. राज्य सरकारच्या तिजोरीवर तब्बल ४ लाख ९६ हजार १९२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. केंद्र सरकारने देशभरात जीएसटी करप्रणाली लागू केल्यापासून नव्या करप्रणालीतून सावरण्याचा प्रयत्न राज्य सरकारला करावा लागतोय.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com