कोल्हापूर आता कुठे जरा स्थिरस्थावर होत असताना कोल्हापूरात जिल्हा प्रशासनाने एक अजब निर्णय घेतलाय. पुरग्रस्तांकडून गोंधळ होण्याच्या शक्यतेने जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे आदेश जारी केलेत. जमावबंदीच्या आदेशानंतर पुरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम प्रशासनाकडून होत असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून उमटतायत. 24 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश देण्यात आलेत.
पुणे-बंगळूर महामार्ग अत्यावश्यक वस्तूंसाठी सुरु; अद्याप दीडफूट पाणी
कोल्हापूर : महापुरामुळे गेल्या आठ दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यानचा महामार्ग आज (सोमवारी) सकाळी तातडीच्या वस्तू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, सिलिंडर, औषधे तसेच भाजीपाल्यासाठी वाहतूक सुरू करण्यात आले आहे.
WebTitle : marathi news kolhapur district government gives order of jamavbandi till 24th august
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.