CRPF जवानांच्या सुरक्षिततेबाबत धोरणात्मक स्तरावर बदलांची शक्यता

CRPF जवानांच्या सुरक्षिततेबाबत धोरणात्मक स्तरावर बदलांची शक्यता

अनंतनाग : जम्मू-काश्मीरात तैनात जवानांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय राखीव पोलिस दलाकडून या बदलांसाठी रणनिती आखण्यात येत आहे.  

राष्ट्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) तुकडीवर अनंतनाग येथे बुधवारी झालेला पुलवामा हल्ल्यानंतरचा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला होता. पाच सुरक्षा रक्षकांना या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. या हल्ल्याच्या तपासात हाती आलेल्या माहितीप्रमाणे, स्थानिकांच्या मते हा हल्ला पाकिस्तान स्थित जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेने केला आहे. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर येथील जवानानांच्या सुरक्षिततेबाबत मोठ्या प्रमाणात धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याच्या हालचाली आहेत. 

गेल्या बुधवारी (ता. 12) काश्मीरातील अनंतनाग येथील गर्दीच्या रस्त्यावर तैनात राष्ट्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीवर दुचाकीस्वार दहशतवाद्यांनी बंदुक ताणली. ज्यात पाच जवान हुतात्मा झाले. हा हल्ला 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यानंतरचा दुसरा मोठा जवानांवरील थेट हल्ला आहे. 

गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, 'सीआरपीएफ जवानांवर दिवसाढवळ्या हल्ला झाला आहे. या वेळात गर्दीचा फायदा घेत जवानांवर हल्ला करणे हे सोपे आहे. कारण जवान खुल्या जागी, थेट रस्त्यावर तैनात असतात. हे बदलायला पाहिजे. जवानांना एखाद्या पोलिस स्टेशन किंवा बंदिस्त परिसरात तैनात करायला पाहिजे. जेणेकरुन दहशतवाद्यांना थेट हल्ला करता येणार नाही आणि जवानांनाही प्रतिकार करण्याची संधी मिळेल.' 

'सीआरपीएफच्या जवानांना सामान्य लोकांपासून दूर ठेवायला हवे. विशेषतः जेव्हा स्थानिक पोलिसांना मदतीची गरज पडते तेव्हा हे जवान उपलब्ध होऊ शकतील, अशी सोय व्हायला हवी. जेणेकरुन अशा हल्ल्यांनाही बळी पडण्याची शक्यता कमी होईल.' असे देखील गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

सीआरपीएफचे मुख्य निर्देशक राजीव राय भटनागर यांनी केंद्रिय गृह सचिव राजीव गोबा यांना सांगितल्याप्रमाणे, 'पुलवामा आत्मघाती हल्ल्यानंतर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. अनंतनाग येथे झालेला हल्ला ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण महामार्गापासून केवळ 35 किलोमीटर अंतरावर आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या वेळी देखील सुरक्षा कडक नसल्याने दहशतवाद्यांना महामार्गावरुन थेट घुसता आले.' या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये येणाऱ्या अमरनाथ यात्रेतील सुरक्षेबाबतही चर्चा झाली. 

सध्या जम्मू-काश्मीरात दहशतावाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु ठेवले आहेच. शिवाय दहशतवाद प्रभावी परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठीही सीआरपीएफ स्थानिक पोलिसांची मदत करते आहे.  

Web Title: After Anantnag terror attack CRPF may change J and K deployment pattern
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com