भारतीय म्हणून अभिमान वाटावा अशी बातमी.. बातमी आहे भारताच्या उंचावलेल्या प्रगतीच्या आलेखाची. देशातील गरीबी घटल्याची आकडेवारी समोर आली आहे.
२००६ ते २०१६ या काळात २७.१० कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढून भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे. भारताने शालेय शिक्षणाबरोबरच आरोग्य आणि इतर अनेक क्षेत्रांत प्रगतीचा आलेख उंचावलाय. गरिबी कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दहा देशांमध्ये भारताने भरारी घेतली आहे.
भारतातील सर्वांत गरीब असलेल्या झारखंड या राज्याने गरिबीवर मात करण्यात देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. ही माहिती संयुक्त राष्ट्र संघटनेच एमपीआय २०१९च्या अहवालात जाहीर करण्यात आली आहे.
WebTitle : marathi news Indians Poverty reduced UN report
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.