राशनकार्डला आधारलिंक न केल्यामुळे राशन दुकान मालकाने गेल्या दोन महिन्यांपासुन धान्य दिले नव्हते. त्यामुळे उपाशी पोटी राहण्याची वेळ एका वृद्ध दांपत्यवर आली. आणि 21 सप्टेंबरला त्या गोविंद गवईचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.
भुकेपोटी पतिचा मृत्यु झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं केलाय. या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. आधार नसल्यानं किंवा आधार लिंक न केल्यानं कुणालाही सरकारी योजना नाकारता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतरही देशात अशा प्रकारे लोकांचे नाहक बळी जातायत ही बाब संतापजनकच म्हणावी लागेल.
WebTitle : marathi news hunger death in maharashtra aadhar link to ration card
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.