राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र अद्यापही सुरूच आहे. तीन महिन्यात तब्बल 221 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मराठवाड्यात तर गेल्या 21 दिवसात 66 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचं दिसतंय. कर्जमाफी केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढतंय. कर्जबाजारीपणा, शेतमालाला कवडीमोल भाव यामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय..
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.