मुंबई : कर्नाटकमध्ये भाजपने विजय मिळविल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य करत हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा (इव्हीएम) विजय असल्याचे म्हटले आहे.
#KarnatakaElections
‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो.
— Raj Thackeray (@RajThackeray) May 15, 2018
यापूर्वी विविध राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने विजय मिळविल्यानंतर इव्हीएमला दोष देण्यात आला होता. उत्तर प्रदेशात भाजपने विजय मिळविल्यानंतर मायावती यांनी इव्हीएममुळेच भाजप जिंकल्याचे म्हटले होते. इतर राज्यांतही इव्हीएमलाच दोष देण्यात आला होता. आता कर्नाटकमध्ये भाजपने विजय मिळविल्यानंतर राज ठाकरेंसह काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांनीही इव्हीएममुळेच भाजप जिंकल्याचे म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी ट्विटर आणि फेसबुक पेजवरून ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो असे म्हटले आहे. तर, मोहन प्रकाश यांनी म्हटले आहे, की मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की भारतातील प्रत्येक पक्षाने इव्हीएमवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. भाजपनेही यापूर्वीही हे केलेले आहे. सगळ्याच पक्षांना इव्हिएमबद्दल प्रश्न असेल तर बॅलेटच्या साहाय्याने निवडणुका घेण्यास काय हरकत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.