20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसंच अटी आणि शर्तींच्या अधारे काही उद्योग, व्यवसाय सुरू केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय. काही उद्योग, व्यवसाय सुरू झाल्यास अर्थव्यवस्थेचं चक्र हळूहळू का होईना फिरत राहील. यादृष्टीनं सुधारित नियमावली जारी करण्यात आलीय. साम आणि सकाळनं या संदर्भात सर्वात आधी भूमिका घेतली होती. अर्थव्यवस्थेचा गाडा सुरळीत चालवायचा असेल तर काही अंशी काळजी घेऊ उद्योग, व्यवसाय सुरू करावेत अशी भूमिका साम टीव्हीनं घेतली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी देखील याबाबत सुतोवाच केलं होतं. त्यानंतर आता सरकारनं प्रत्यक्षात कृती करायला सुरूवात केलीय.
पाहा सविस्तर...
20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रमांना सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरून राज्यतच्या अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होईल. यादृष्टीने राज्य सरकारने आता सुधारित मार्गदर्शक आदेश जारी केलेत.
२० एप्रिलनंतरही हे बंदच राहणार
२० एप्रिलपासून 'या' गोष्टी सुरु आहे सशर्त परवानगी
कोरोनाचा मुकाबला करणे हे लॉकडाऊनचे मूळ उद्दिष्ट्य अबाधित राहून कंटेंनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतरत्र स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील. केंद्राने निर्देश दिल्याप्रमाणे लॉकडाऊन 3 मे पर्यंत आहे. त्याचे अतिशय काटेकोर पालन करायचे आहे . सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळणे, नियमित मास्क घालणे या व अशा कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत. कुठल्याही कारणांसाठी गर्दी झालेली चालणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थनास्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी असणार नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.