औरंगाबादकरांच्या कचराकोंडीचा प्रश्न कधी सुटणार, याचं कोडं उलगडण्यात अद्याप प्रशासनाला यश आलेलं नाही. सलग 16 व्या दिवशी औरंगाबादकरांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने संतापाचा कडेलोट झालाय. त्यामुळेच नागरिकांच्या वाढत्या दबावापुढे झुकत, ग्रामस्थांच्या विरोधाकडे कानाडोळा करत पालिका प्रशासनाने जबरदस्तीने गोलवाडी परिसरात कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या केल्या. मात्र त्यानंतर वाढत्या विरोधामुळे पालिकेने कचरा गाड्या कांचनवाडी परिसराकडे वळवल्या. मात्र तेथील ग्रामस्थांनी थेट रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केली. यावेळी प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्तसुद्धा ठेवण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.