सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली. तसेच राजकारण देखील तितकच पेटलं मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर कुठलीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. आज गुढीपाडवा मेळाव्या निमित्त दादर येथील शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येवर या सगळ्याला कोण जबाबदार आहे सर्वच सांगितले.
राज ठाकरे म्हणाले, आज त्या बीडला चे झालं ते संतोष देशमुख त्या बिचार्यांला किती घाणेरड्या पद्धतीने मारलं. तुमच्या नसांमध्ये जर एवढी क्रूरता भरली असेल ना मी दाखवीन जागा तिथे जा!पण हे सगळं झालं कशामुळे ते विंडमिल, तिकडची ऐश आणि प्रकल्पामधून निर्माण होणारी जी काही राख आहे. आणि या राखेमधूनच बीड मधील गुंड तयार होत आहे. तो विषय सगळा होता पैशाचा ही जी काय वाल्मीक कराड आणि बाकीचे लोकांची नाव येत आहे. हे सगळ्या खंडण्या या संतोष देशमुख ने त्याला विरोध केला. उद्या तिथे संतोष देशमुख नसता दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असतं पैशांचा विषय होता, खंडणीचा विषय होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा, आणि आम्ही लेबल काय लावलं वंजाऱ्यांनी मराठ्याला मारलं त्यात वंजारीचा संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध कशात गुंतून पडतोय. पण तुम्हाला गुंतवले जात आहे हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवत आहे आणि त्यांना तेच हव आहे. अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.