सत्ता स्थापनेच्या वेळी आमदारांच्या क्षमता, वर्तणूक आणि इतिहास विचारात घेऊन मंत्रिमंडळात मंत्रिपदं दिली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातील कामगिरी, विधानसभा निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य आणि विधानसभा आमदारांबद्दल असलेलं जनमत विचारात घेऊनच महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्रिपदं वाटली जाणर आहेत. त्यामुळे कोणतीही कोंट्रोव्हर्सी नसलेला चेहेरा यावेळी महायुतीच्या मंत्रिमंडळात बघायला मिळणार आहे.
वादग्रस्त नसलेल्या चेहऱ्यांना महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार आहे. यासाठी यासाठी आमदारांची कार्यक्षमता, वर्तणूक आणि इतिहास विचारात घेतला जाईल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेली मतदारसंघातील कामगिरी देखील बघितली जाणार आहे. तसंच मताधिक्य आणि आमदारांबाबतच जनमतही पहिलं जाणार आहे. केंद्रीय नेतृत्व, तसंच फडणवीस शिंदे आणि अजित पवार मेरिटवर मंत्रिपद देणार आहे. मंत्रिमंडळात जुने चहरे टाळण्यात येणार असून कार्यक्षमतेच्या जोरावर नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. खातेवाटप आणि पालकमंत्रिपदाचा निर्णय देखील याच निकषांवर केला जाणार आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.