Suneung Exam: जगातील सर्वात अवघड परीक्षा; 9 तास बसून सोडवावा लागतो पेपर
Suneung Exam: जगातील सर्वात अवघड परीक्षा; 9 तास बसून सोडवावा लागतो पेपर Saam TV
देश विदेश

Suneung Exam: जगातील सर्वात अवघड परीक्षा; 9 तास बसून सोडवावा लागतो पेपर

वृत्तसंस्था

जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली दक्षिण कोरियाची सुनेयुंग परीक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणाऱ्या या परीक्षेला दरवर्षी ५ लाख विद्यार्थी बसतात. परीक्षा 9 तास चालते. ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणेज पाचही बोटं तुपास असं समजले जाते.

काय आहे सुनेयुंग परीक्षा?

दक्षिण कोरियामध्ये ही परीक्षा विद्यापीठ प्रवेशासाठी घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होणे हे उच्च शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. परीक्षा अत्यंत अवघड असल्याने पालकांकडून यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते म्हणतात, दरवर्षी लाखो मुले या परीक्षेला बसतात. कठीण परीक्षांमुळे मुलांमध्ये नैराश्य वाढत आहे. त्यामुळे परीक्षा सोपी करणे आवश्यक आहे.

मंदिरात मुलं पास होण्यासाठी पालक करतात प्रार्थना

दरवर्षी नोव्हेंबरमध्ये परीक्षेपूर्वी पालकांची गर्दी सेऊलजवळील मंदिरात जमते. हे पालक आपल्या मुलांजवळ परीक्षेत यश देण्यासाठी देवाला प्रार्थना करतात. ते म्हणतात, मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी ही परीक्षा आवश्यक आहे, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त कठीण असणे मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही.

परीक्षा उत्तीर्ण न झाल्याने अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या परीक्षेमुळे येथील तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. विकसित देशांबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण कोरियामध्ये तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथे गेल्या पाच वर्षांत २४ वर्षांपर्यंतच्या तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले आहे.

परीक्षेसाठी बदलले जाते ट्रेन ते फ्लाइटचे वेळापत्रक

दक्षिण कोरियामध्ये ही परीक्षा किती महत्त्वाची मानली जाते, हे यावरून समजू शकते की परीक्षेच्या वेळापत्रकावरुन ट्रेन ते फ्लाइटपर्यंत सर्वांचे वेळापत्रक बदलते. सर्व सरकारी कार्यालये, बँका आणि शेअर बाजार उघडण्याचे तास बदलतात. ज्या मुलांना त्यांच्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचता येत नाही, त्यांना नेण्यासाठी पोलिसांकडून वाहने दिली जातात.

परीक्षेशी संबंधित वादही कमी नाहीत

या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ तणाव आणि नैराश्यच नाही तर या परीक्षेशी संबंधित इतरही अनेक कारणे आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांन विजेते म्हटले जाते, पण परीक्षेत नापास होणार्‍यांना आयुष्यभराचा अपव्यय समजला जातो, असे पालकांचे म्हणणे आहे. त्या मुलांकडे या दृष्टिकोनातून पाहिले जाते. ही परीक्षा रोट पद्धतीवर आधारित असल्याने त्यात बदल करण्याची गरज असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: राज्यातील १३ जागांवर ठाकरे गटविरुद्ध शिवसेना,तर १५ जागेवर काँग्रेसची भाजपशी लढत

Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

Amitabh Bachchan: कोस्टल रोड, अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट; भाजप अन् आदित्य ठाकरेंमध्ये रंगलं ट्विट वॉर

Investment Tips: गुंतवणूक करताना 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT