उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मेरठमधील स्मशानभूमीत एका तरूणाची चिता जळत असताना दोन संशयास्पद तरूण तेथे पोहोचले. नंतर त्यांनी तांत्रिक विधी करण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जळत्या चितेतून मृतदेहाची कवटी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक तरूण कवटी घेऊन पसार झाला. दुसऱ्याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही संपूर्ण घटना रोहता पोलीस स्टेशन परिसरातील पूथखास गावातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूथखास गावातील रहिवासी नेपाळ सिंग पाल यांचा मुलगा मनीष पाल (वय वर्ष २५) याचे शनिवारी दुपारी कर्करोगाने निधन झाले. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी संध्याकाळी अंत्यसंस्कार केले. काही वेळाने कुटुंबातील सदस्य चितेची आग पाहण्यासाठी पुन्हा स्मशानात गेले.
तेव्हा त्यांना तेथे दोन अज्ञात तरूण संशयास्पद अवस्थेत दिसले. दोघेही चितेजवळ गेले आणि जळच्या मृतदेहाची कवटी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही पाहताच गावकऱ्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर एक तरूण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला, तर दुसऱ्याला पकडण्यात आले. गावकऱ्यांनी असा दावा केला आहे की, पळून गेलेला तरूण मृतदेहाची कवटी घेऊन पसार झाला.
स्मशानभूमीत सुपारी, कुंकू, पाच प्रकारच्या मिठाई आणि इतर साहित्य देखील सापडले. यामुळे काळ्या जादूचा प्रकार घडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच रोहता पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुरावे जप्त करण्यात आले असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.