Osmanabad; सकाळी उठून पेपर पहावं लागतं आज कोणाचा नंबर- संजय राठोड Saam Tv
महाराष्ट्र

Osmanabad; सकाळी उठून पेपर पहावं लागतं आज कोणाचा नंबर- संजय राठोड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : महाराष्ट्राचे राजकारण सध्या संक्रमणाच्या स्थितीतून जात आहे. राजकारणाची पातळी खालावली असून, रोज सकाळी- सकाळी उठून पेपरमध्ये पहावं लागतं आज कोणाचा नंबर आहे, अशी चिंताजनक प्रतिक्रिया माजी मंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बंजारा समाजाच्या प्रश्नासंदर्भात ते सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत.

हे देखील पहा-

त्यानिमित्त ते उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. यावेळी विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांवरती स्पष्टीकरण देत माझ्यावर देखील संकट आले आहे. मी स्वतः दीन दलीत समाजाला सेवा देण्याचं काम करतो. बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे मी काम करत होतो. मात्र, माझी 30 वर्षाची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द विरोधकांनी उधळून फेकून दिली आहे. माझी चौकशी होऊ द्यायला हवी होती.

मात्र, तत्पूर्वीच माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. तसेच तुम्हीच आरोप करता, तुम्हीच फाशीवर लटकावा म्हणता आणि तुम्हीच न्यायाधीश होता, असे म्हणत हे महाराष्ट्रातील बदलत गेलेलं हे राजकारण कुठ तरी थांबल पाहिजे. महाराष्ट्राची राजकारणातील वैभवशाली परंपरा जपली पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT