नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत असणारे आमदार,मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय.त्यांनी थेट राहूल गांधी आणि प्रियंका गांधींवर टीका केलीये. काय म्हणालेच नितेश राणे ज्यावरुन त्यांच्यावर टीका होतेय.पाहया. हिंदुत्वाच्या विषयावर आक्रमकपणे बोलताना कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आतापर्यंत अनेकदा प्रक्षोभक वक्तव्य केली आहेत.
त्यातच फडणवीस सरकारमध्ये मंत्री झालेले भाजप नेते नितेश राणे यांनी आता केरळची तुलना थेट पाकिस्तानसोबत केलीये. केरळ हा मिनी पाकिस्तान झाला आहे, त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तिथून निवडणूक जिंकतात असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलंय..काय म्हणालेत राणे आणि त्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी काय प्रतिक्रीया दिलीये पाहूया.
पुण्यातील सासवड येथे अफजल खान वधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांत त्यांनी हे वक्तव्य केलं.मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ते राणेंचं वैयक्तिक मत असल्याचं म्हणत पाठराखण केलीये.
दरम्यान, नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही राणेंनी मुस्लिमांवरोधात वादग्रस्त वक्तव्य केली होती. मीरा रोड हिंसाचार प्रकरणातही राणे वादात आले होते. पोलिस ठाण्यात पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.त्यामुळे आता जबाबदारीच्या पदावर असलेल्या मंत्री नितेश राणेंना पक्ष तंबी देणार की वाचाळ राणे आपली प्रक्षोभक वक्तव्य सुरुच ठेवणार हेच पाहायचं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.