मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महायुतीच्या 8 वादग्रस्त मंत्र्यांची विकेट पडणार असल्याची माहिती समोर आलीय... तर संजय राऊतांनी त्यापैकी 4 मंत्र्यांची नावंच जाहीर केली आहेत.
खरंतर महायुती सरकारच्या स्थापनेनंतर मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप आणि वादग्रस्त वक्तव्य यामुळे सरकारच्या प्रतिमेला तडा जातोय... त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे... त्यामुळे मुख्यमंत्री 8 मंत्र्यांना नारळ देऊन मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगलीय...ठाकरेंच्या मुखपत्रात कोणते 8 मंत्री हिटलिस्टवर असल्याचं म्हटलंय पाहूयात..
या मंत्र्यांचा पत्ता कट होणार? - हेडर
भरत गोगावले
रोहयो, फलोत्पादनमंत्री
दादा भुसे
शालेय शिक्षणमंत्री
संजय शिरसाट
सामाजिक न्यायमंत्री
योगेश कदम
गृहराज्यमंत्री
माणिकराव कोकाटे
कृषीमंत्री
नरहरी झिरवाळ
अन्न आणि औषध मंत्री
नितेश राणे
मस्त्यविकास, बंदरेमंत्री
जयकुमार गोरे
ग्रामविकास मंत्री
तर राऊतांच्या दाव्यानंतर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर मंत्रिमंडळाच्या फेरबदलाकडे डोळे लावून बसलेत...
तर भाजप आणि शिंदे गटाने मात्र राऊतांचा दावा फेटाळून लावलाय...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या 25 मिनिटं झालेल्या बैठकीत वादग्रस्त मंत्र्यांमुळे सरकारची डागाळत असलेली प्रतिमा, हनी ट्रॅपचं प्रकरण या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय... त्यामुळे भाजपच्या चाणक्याने मंत्रिमंडळातील फेरबदलाला हिरवा कंदिल दाखवला आहे का? गच्छंती होणाऱ्या मंत्र्यांच्या जागी संधी कोणाला मिळणार याचीही उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.