औरंगाबाद - शहर आणि जिल्ह्यात १० नोव्हेंबरपासून No Vaccine; No Entry हा नियम लागू करण्यात आल्याने औरंगाबादमध्ये (Aurangabad) आठवडाभरातच चार पटीने लसीकरणात (Corona Vaccination) वाढ झाली आहे. त्यामुळे लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न (Aurangabad Pattern) यशस्वी होतोय.
हे देखील पहा -
औरंगाबाद जिल्ह्यात नो व्हॅक्सिनेशन नो एन्ट्री असा नियम लागू करताच आठवडाभरातच लसीकरणामध्ये चार पटीने वाढ झाली आहे. आठवडाभरापूर्वी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही लसीकरण केंद्र ओस पडली होती. लोक लस घ्यायला येत नव्हते. शेवटी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ज्या व्यक्तीने लस घेतली नाही, त्या व्यक्तीला पेट्रोल, डिझेल, गॅस, रेशन दिले जाणार नाही आणि कोणत्याही दुकानात, मॉल, पर्यटनस्थळी प्रवेश दिला जाणार नाही, असे आदेश काढले होते.
औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचा हा पॅटर्न लसीकरणाला गती देणारा ठरलाय. आता महाराष्ट्रातील लसीकरणाची गती वाढवायची असेल तर औरंगाबाद पॅटर्न लावायचा का याचाही विचार करायला हरकत नाही.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.