Sakshi Sunil Jadhav
तुम्ही जितकं बाहेरचं खातं मग ते महाग असो वा स्वस्त, त्याने तुमच्या आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
पुढील माहितीत आपण तज्ज्ञांनी दिलेल्या ७ अशा सवयींबद्दल जाणून घेण्यार आहोत, ज्याने तुम्हाला आतड्यांच्या समस्येला सामोरं जावं लागतंय.
सगळ्यात आधी तुम्ही जेवताना स्क्रीनचा वापर करणं थांबवलं पाहिजे. कारण त्याने तुमच्या मेंदूला पोट भरल्याचा संकेत मिळत नाही. म्हणजेच जेवण तुमच्या अंगी लागत नाही. पचनसंस्थाही बिघडते.
अनेकजण इंटरमिटंट फास्टिंगच्या नावाखाली नाश्ताच करत नाहीत. पण नीट वेळापत्रकाशिवाय जेवण चुकवलं तर शरीरातल्या कॉर्टिसोल हार्मोन्सचं प्रमाण वाढतं.
अनेकांना जेवणानंतर गोड खायला आवडतं. पण याने तुमच्या आतड्यांचं नुकसान होऊ शकतं.
आयबुप्रोफेनसारख्यी औषधं जास्त प्रमाणात खाल्यावर तुमच्या किडनीला सूज येऊ शकते. याची लक्षणं तुम्हाला जाणवत नाहीत.
शरीराला आणि पचनसंस्थेला दिवसभर योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. रात्री एकदम भरपूर पाणी प्यायल्याने दिवसभराची कमतरता भरून निघत नाही.
शौचाला झालं की सारखं दुर्लक्ष करणं धोक्याचं ठरू शकतं. यामुळे दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, बहुतेक लोकांमध्ये यापैकी किमान चार सवयी आढळतात. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी वेळेवर जेवण, पुरेसे पाणी पिणं, संतुलित आहार घेणं आणि डेली रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.