Surabhi Jayashree Jagdish
मुरूड-जंजिरा हा रायगड जिल्ह्यातील अभेद्य किल्ला आहे. उत्तर आणि दक्षिण या प्राचीन बंदरांच्या मधोमध हा चंद्रकोर अर्ध वर्तुळाकार किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक प्रयत्न करूनही त्यांना हा किल्ला जिंकला आला नाही.
जंजिरा किल्ला हा अरबी समुद्रातील अभेद्य समुद्रकिल्ला असून तो सिद्दींच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र किल्ल्याची मजबूत रचना आणि सिद्दींची नौदलशक्ती यामुळे ते यशस्वी झाले नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी जवळपास 3–4 वेळा प्रयत्न केले. मात्र यावेळी एकदाही त्यांना यश मिळालं नाही. हा किल्ला नेहमी सिद्दींच्या ताब्यात राहिला
पहिला प्रयत्न थेट लष्करी हल्ल्याचा होता. महाराजांनी समुद्रमार्गे हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळते. पण सिद्दींच्या जहाजांमुळे तो परतवला गेला.
दुसरा प्रयत्न गुप्त योजनेचा होता. महाराजांनी किल्ल्यातील काही सैनिकांना फितूर करून आतून दरवाजा उघडण्याची योजना आखली. मात्र ही योजना देखील यशस्वी झाली नाही.
तिसरा महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे जंजिराला पर्याय म्हणून पद्मदुर्ग (कासा किल्ला) बांधणं हा होता. हा किल्ला जंजिरावर नजर ठेवण्यासाठी आणि सिद्दींच्या योजना जाणून घेण्यासाठी उभारण्यात आला.
या गोष्टी सभासद बखर, शिवभारत आणि A History of the Maratha People या ठिकाणी लिहिलेली आढळते. यावरून याचा संदर्भ घेण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.