Siddhi Hande
नाश्त्याला चटपटीत पदार्थ सर्वांनाच आवडतात. परंतु याचसोबत तो पदार्थ पौष्टिकदेखील असायला हवा.
तुम्हाला जर पौष्टिक आणि चटपटीत पदार्थ खायचा असेल तर मिक्स भाज्यांचे कटलेट बनवू शकता.
बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, हळद, मिरची पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, उकडलेला बटाटा, लिंबाचा रस, कोथिंबीर, तांदळाचे पीठ, रवा, तेल
सर्वात आधी पॅनमध्ये तुम्हाला तेल गरम करायचे आहे. त्यात कांदा परतून घ्यायचा आहे.
यामध्ये आलं-लसूण पेस्ट टाका. त्यात तुमच्याजवळच्या सर्व भाज्या चिरुन टाका. ३-४ मिनिटे शिजवून घ्या.
यामध्ये हळद, लाल तिखट, मिरची पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ टाकायचे आहे.
हे सर्व मिश्रण छान मिक्स करुन घ्या. यानंतर गॅस बंद करा त्यात मॅश केलेला बटाटा आणि कोथिंबीर टाका. वरुन लिंबाचा रस टाका.
मिश्रण थंड झाल्यावर तांदळाचे पीठ घाला आणि मळून घ्या.
या पीठाला कटलेटचा आकार द्या. हे कटलेट रव्यात बुडवून घ्या.
यानंतर तव्यावर तेल टाकून शॅलो फ्राय करा. हे कटलेट तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.