Sakshi Sunil Jadhav
गुरु चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि भविष्यात यशाचा मार्ग दाखवणारे थोड गुरु मानले जातात.
चाणक्य नितीमधल्या शिकवणी या नाते सुधारण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी तसेच भविष्यात सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
चाणक्य म्हणतात, जसं जंगलातलं एक सुकलेलं झाड असतं, त्याला आग लागली की संपूर्ण जंगल नष्ट होतं. त्याचप्रमाणे विशिष्ट स्वभावाचा मुलगा तुमचं घर उद्भवस्त करू शकतो.
वाईट संगत असलेल्या मुलामुळे कुटुंबाचा मान - सन्मान आणि समाजातली प्रतिष्ठा कमी होऊ शकते.
चाणक्यांच्या मते, २ उद्धट मुलं असण्यापेत्रा १ गुणी मुलगा पालकांसाठी खूप मौल्यवान असतो.
शिक्षण, ज्ञान आणि चांगले संस्कार नसतील तर व्यक्तीचं जीवन अपूर्ण राहतं, असं चाणक्य म्हणतात.
चाणक्यांच्या विचारानुसार, अध्यात्मिक सवयी असलेल्या मुलांचे व्यक्तीमत्व हे सर्वात जास्त असते.
जसे सुगंधी फुलांचे झाड संपूर्ण जंगलाला सुंगधित करतं, त्याचप्रमाणे गुणी मुले ही त्यांच्या कर्तृत्वाने कुटुंबाचं नाव मोठं करतात.
संस्कारी आणि यशस्वी मुलांमुळे समाजात पालकांचं कौतुक होतं आणि त्यांचा मान वाढतो. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच वळण लावणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.