Sakshi Sunil Jadhav
पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मस्त थंड वातावरणात तुम्ही फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर पुढची माहिती खास तुमच्यासाठी आहे.
चाळीसगाव परिसरातला धवलतीर्थ धबधबा पावसाळ्यात पूर्ण जोमात वाहत असतो. उंचावरून कोसळणारे पाणी आणि हिरवागार परिसर असे तिथले वातावरण असते.
डोंगररांगांच्या कुशीत वसलेले केदारकुंड हे निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी आवडते ठिकाण बनले आहे. पावसाळ्यात तिथे पाण्याचा प्रवाह जास्त सुंदर दिसतो.
पंचधारा धबधब्याची खासियत म्हणजे एकाच ठिकाणी पाच पाण्याचे प्रवाह दिसतात. त्यामुळे हा धबधबा पर्यटकांना खूप आवडतो.
वाक्कड धबधबा अजूनही अनेक पर्यटकांसाठी अनोळखी आहे. शांत वातावरण, डोंगर आणि धबधब्याचा नजारा मनाला वेगळाच आनंद देतो.
सिताखोरी हे फक्त पर्यटनस्थळ नाहीतर धार्मिक आणि ऐतिहासिक गोष्टींसाठीही प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तुम्हाला इथे धबधबे आणि हिरवाई पर्यटकांना आकर्षित करेल.
जुलै-ऑगस्ट महिन्यात या धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे लोकप्रियता वाढत आहे.
धबधबे, दऱ्या आणि हिरवागार निसर्ग यामुळे हा परिसर फोटोग्राफर्ससाठी स्वर्ग मानला जातो. प्रत्येक ठिकाणी अप्रतिम फोटो पॉइंट्स उपलब्ध आहेत.
नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि धुळे येथून अनेक पर्यटक विकेंडला या ठिकाणांना भेट देतात. कमी खर्चात सुंदर पर्यटनाचा अनुभव येथे मिळतो.