Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आहेत. तसेच त्यांनी जीवनात येणाऱ्या संघर्षांबद्दल गुपितं दिली आहे. याचा वापर करुन आपण दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी सहज हाताळू शकतो.
कोणालाच आपला अपमान सहन करून घ्यायला आवडत नाही, म्हणून त्याला तिथेच प्रतिसाद देणे हे सुद्धा योग्य नाही.
पुढे आपण चाणक्यांनी दिलेल्या टेकनिक नुसार अपमानाचा बदला घेऊ शकतो. त्यासाठी डोकं शांत ठेवणे, वेळ घेणे आणि बुद्धीचा वापर करणे योग्य ठरते.
चाणक्यांच्या मते, अपमानाच्या क्षणी शांत राहणारा व्यक्ती सर्वात बुद्धिमान असतो. कारण रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमीच पश्चात्तापाला कारणीभूत ठरतात.
चाणक्य सांगतात की, अपमान तुम्हाला कमी लेखण्यासाठी नव्हे, तर उभं राहण्यासाठी एक संधी देतो. त्याला आपल्या यशासाठी इंधन बनवा.
तुमचं यशच त्या अपमानाला उत्तर देतं. जेव्हा तुम्ही प्रगती करता, तेव्हा पूर्वी हसणारेच लोक तुमच्या यशाचे उदाहरण देतात.
अपमान करणाऱ्याच्या शब्दांना उत्तर देण्यापेक्षा तुमची ऊर्जा स्वतःला उंचावण्यात वापरा. हाच खरा आत्मविकासाचा मार्ग आहे.
अपमानाला शत्रू न समजता, शिक्षक माना. प्रत्येक अपमानातून काहीतरी शिकून स्वतःला अधिक मजबूत बनवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.