Surabhi Jagdish
सध्या सर्वांच्या घरी दिवाळीची सुरुवात झाली असेल. दिवाळीपूर्वी वास्तुचे हे 5 नियम पाळतेत तर तुम्हाल आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.
वास्तूनुसार, जर तुमच्या स्वयंपाकघरात भांडी किंवा इतर खराब वस्तू तुटल्या असतील तर त्यांना दिवाळीपूर्वी घराबाहेर फेकून द्या.
काही घरांमध्ये संध्याकाळी अन्न शिल्लक राहतं. तेच अन्न लोकं दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी वापरतात. मात्र शिळं अन्न कधीही खाऊ नये. यामुळे घरात पैशांची कमतरता निर्माण होते.
स्वयंपाक घरात चुकूनही शिळं अन्न ठेवू नका. असे केल्याने घरातील इतर सदस्यांवर आर्थिक संकट येतं
वास्तूनुसार, किचनमध्ये चुकूनही औषधं ठेवू नये. त्यामुळे घरातील वातावरण खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे दिवाळीपूर्वी लगेचच स्वयंपाकघरातून औषधे काढून टाका.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, लोक स्वयंपाकघरात कचऱ्याचा डबा ठेवतात. परंतु यामुळे स्वयंपाकघरात नकारात्मकता वाढू शकते.
मळलेले पीठ जास्त वेळ स्वयंपाकघरात ठेवू नये. यामुळे पती-पत्नीमध्ये त्रास होण्याची शक्यता असते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.