Bharat Bhaskar Jadhav
वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी हवं असेल तर नवरा-बायको एक गोष्ट सर्वात जास्त केली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे गप्पा. एकमेकांशी मनमोकळ्यापणाने बोललं पाहिजे.
नवरा-बायकोमधील चांगला संवाद, मनमोकळ्या गप्पा ह्या त्यांच्या नात्याला कवच प्रदान करत असतात.
जर तुम्ही संभाषणादरम्यान तुमच्यामध्ये भिंत निर्माण केली तर त्यामुळे नातेसंबंधात अविश्वास निर्माण होऊ शकतो.
तुमचं बोलणं तुमचा जोडीदार समजून घेत नसेल तर त्याला वेगवेगळ्या मार्गाने समजवा. पण दोघांमध्ये तिसरा व्यक्ती आणू नका.
जर तुमच्या दोघांच्या संभाषणात तिसऱ्या व्यक्तीला आणलं नाही तर तुमच्या नात्यातील दुरावा कमी होतो.
जेव्हा नवरा-बायको एकमेकांशी जास्तवेळा गप्पा करतात तेव्हा ते एकमेकांच्या आवडी निवडी समजू लागतात.
दोघांमध्ये चांगला संवाद ठेवला तर दोघांमधील दुरावा कमी होत ते एकमेकांच्या जवळ येत असतात.
जेव्हा आपण आपल्या जोडीदाराला चांगलं समजतो तेव्हा आपल्यातील नात हे अधिक भावनिक होत असतं. हे नातं कधीच तुटत नसतं.
येथे क्लिक करा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.