Shreya Maskar
पावसाळ्यात वीकेंडला तुम्ही मुंबईजवळ फॅमिली ट्रिप प्लान करायची असेल तर येऊर धबधबा बेस्ट ऑप्शन आहे. हे ठिकाण फोटोशूटसाठी देखील बेस्ट आहे.
येऊर धबधबा हा मुंबईपासून साधारण ३५-४० किमी अंतरावर, ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत वसलेला आहे. हे ठिकाण वन डे ट्रिपसाठी बेस्ट लोकेशन आहे.
येऊर धबधब्याला गेल्यावर तुम्हाला पक्षीनिरीक्षण, रंगीबेरंगी कीटक आणि वनस्पती पाहायला मिळतील. तसेच तुम्ही राष्ट्रीय उद्यानात गेल्यावर सायकलिंगचा आनंद घेता येतो.
येऊर धबधब्याला जाण्यासाठी ठाणे स्थानकापर्यंत लोकल ट्रेनने येऊ शकता आणि त्यानंतर रिक्षाने तुम्ही येऊर धबधब्याजवळ पोहचाल.
तुम्हाला जर पहिल्यांदा ट्रेकिंगचा प्लान करायचा असेल तर येऊर धबधबा उत्तम ऑप्शन आहे. पावसाळ्यातील दाट हिरवळ आणि समृद्ध जैवविविधता येथे पाहायला मिळते.
येऊर हिल स्टेशनमध्ये येऊर धबधबा आहे. येथे धुक्याची चादर पाहायला मिळते. तसेच पावसाळ्यात इंद्रधनुष्य खुलते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्यावर कान्हेरी लेणी आवर्जून पाहा. येथे वास्तुकलेचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. बोरवली स्टेशनपासून हे ठिकाण जवळ आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.