ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात लक्ष्मी देवी प्रसन्न झाल्यास घरामध्ये धनधान्याची भरभराट राहाते अशी मान्यता आहे.
ज्योतिषशास्त्रात घरामध्ये धनलाभ होण्यासाठी अनेक उपाय सांगीतले आहे.
शास्त्रानुसार महिलांनी या गोष्टींची काळजी घेतल्यास घरातील तिजोरी नेहमी पैश्यांनी भरलेली राहील.
ज्योतिषशास्त्रानुसार घराबाहेरी परिसर सकाळी उठून स्वच्छ केल्यास देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश करण्याचा मार्ग शुद्ध होतो असं मानलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी अंघोळ करून स्वयंपाकघरात गेल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते अशी मान्यता आहे.
सकाळी उठल्यावर अंगोळ करून प्रसन्न मानाने आणि नियमितपणे पूजा केल्यास घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि पैश्यांची भरभराट होते
सायंकाळी घरातील मंदिरात देवी- देवतांसमोर उदबत्ती आणि दिवे लावल्यास घर प्रसन्न राहाते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही