Shraddha Thik
हिवाळ्यात आपण अनेकदा उशिरा झोपतो आणि सकाळी खूप उशिरा उठतो.
हिवाळ्यात दिवसही लहान असतो. अशा स्थितीत आपण जितक्या उशिरा उठतो तितका आपला दिनक्रम बिघडतो.
जर तुम्ही सकाळी उशिरा उठत असाल तर, नाश्ता केल्यानंतर तुम्हाला दुपारी पुरेशी भूक लागत नाही. म्हणजे तुमच्या खाण्याच्या सवयींवर परिणाम होतो.
उशीरा उठल्याने खाण्याच्या सवयींच्या वाईट परिणामामुळे आरोग्यावर परीणाम होताना दिसतो. अशा स्थितीत हिवाळ्यात सकाळी किती वाजता उठायचे असा प्रश्न पडतो.
आरोग्य तज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला दुपारच्या जेवणानंतर आणि रात्री 2 ते 4 च्या दरम्यान सर्वात जास्त झोप लागते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात दररोज सकाळी 6.30 ते 7 या वेळेत उठले पाहिजे.
याच्या मदतीने तुम्ही काही काळ व्यायाम करू शकाल आणि सूर्यप्रकाशात वेळ घालवल्यामुळे तुमचे शरीर दिवसभर उत्साही राहील.जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांनी सुर्यप्रकाशात काही काळ घालवला पाहिजे.