Shreya Maskar
पावसात येणाऱ्या रानभाज्यांचा आपल्या आहारात समावेश केल्यास अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते.
रक्त शुद्धीकरणासाठी, कावीळ झाल्यास, यकृताची समस्या असल्यास भुईआवळीची भाजी खावी.
कधीही अळूची पाने हाताला तेल लावून हाताळावी. नाहीतर हातांना खाज सुटते. पावसात अनेकांच्या घरी खमंग अळूवडी बनवली जाते.
मूळव्याध , त्वचारोग यावर मायाळूची भाजी रामबाण उपाय आहे.
अंबाडी ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या फुलांची आणि पानांची रुचकर भाजी पावसात बनवता येते.
वाताच्या समस्येवर टाकळाची भाजी फायदेशीर ठरते.
तांदुळजाची भाजी 'व्हिटॅमिन सी' ने परिपूर्ण असते. त्वचेचा दाह आणि अति उष्णतेचा त्रास होत असल्यास तांदुळजा भाजी उपयुक्त ठरते.
कोरड्या खोकल्यावर आणि सर्दीवर कुरडूची भाजी रामबाण उपाय आहे. तसेच लघवीची समस्या असलेल्या लोकांनी कुरडूची भाजीचा आपल्या आहारात समावेश करावा.
ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.