ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व दिले गेले आहे. अनेक जण तुळशीची पूजा करतात.
तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्षमीचा वास असतो अशी मान्यता आहे.
घराच्या परिसरात तुळस असल्यास सुभ मानले जाते आणि यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते असं मानले जाते.
मात्र काही लोकांच्या मनात प्रश्न पडतो की स्वयंपाकघरात तुळशीचे रोप लावावे का?
स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि तुळशीमध्ये लक्षमी देवी वसतात. त्यामुळे स्वयंपाकघरात तुळस लावणे शुभ मानले जाते.
स्वयंपाकघरात लक्ष्मी देवी आणि अन्नपूर्णा देवी एकत्र राहिल्यास घरात सकारात्मकता येते. यामुळे घरात सुख-शांती कायम राहते.
स्वयंपाकघरात तुळशीचे रोप ठेवल्यानंतर त्याची नियमित पूजा करावी. तुळशीचे रोप स्वयंपाकघरात ठेवताना स्वच्छतेची काळजी घ्या. तुळशीच्या रोपाजवळ घाण ठेवू नका
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.