Dhanshri Shintre
संध्याकाळी नारळपाणी प्यायल्यास पचन क्रिया मंदावू शकते, कारण त्यातील नैसर्गिक साखर पचवणे अवघड जाते.
नारळपाणी प्रत्येक ऋतूसाठी, विशेषतः उन्हाळ्यात, शरीर थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेशनसाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक पेय मानले जाते.
सूर्यास्तानंतर संध्याकाळी नारळपाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक अपायकारक ठरू शकते, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
नारळपाणी रात्री प्यायल्यास अपचन, गॅस आणि पोटफुगी होऊन झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
पचनशक्ती आधीच कमजोर असल्यास, रात्री नारळपाणी पिल्याने पचनासंबंधी अधिक त्रास उद्भवण्याची शक्यता वाढते.
नारळपाणी मूत्रवर्धक असल्याने संध्याकाळी पिल्यास लघवी वाढते आणि झोपेत अडथळा निर्माण होतो.
नारळपाणी थंड असते आणि संध्याकाळी सेवन केल्यास शरीराचे संतुलन बिघडते, विशेषतः थंडीमुळे सर्दी-खोकला होणाऱ्यांसाठी हे हानिकारक ठरू शकते.