Rohini Gudaghe
जोडवी हा सोळावा शृंगारचा एक भाग आहे. त्यामुळे स्त्रिया पायात जोडवी घालतात.
जोडवी हे विवाहित होण्याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच प्रत्येक स्त्री लग्नानंतर तिच्या दोन्ही पायांच्या दोन किंवा तीन बोटांमध्ये जोडवी घालते.
शास्त्रानुसार जोडवी देवी लक्ष्मीचे वाहक मानले जाते. त्यामुळे विवाहित स्त्रिया पायात जोडवी घालतात.
पायात जोडवी घालण्यामागे वैज्ञानिक कारण काय आहे?
हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त असल्याचं मानलं जाते.
जोडवी घातल्यामुळे थायरॉइडचा धोका कमी असतो.
जोडवी घातल्याने मासिक पाळी मध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात. त्यामुळे मासिक पाळी नियमित होते.
पायात जोडवे घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते. त्यामुळे पायात जोडवे घातले जातात.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.